हुशार गरजू विद्यार्थ्यांना आधार — एक यशोगाथा

07 Aug 2025 07:52:29
 

हुशार गरजू विद्यार्थ्यांना आधार — एक यशोगाथा

विध्यार्थी विकास योजना हा सेवा सहयोग या संस्थेचा एक स्तुत्य उपक्रम आहे. रवींद्र कर्वे - मुंबई हे या योजनेचे प्रमुख. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान आणि दैनिक - तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येतो. तुकाराम तेलीची ही गोष्ट त्याच उपक्रमाचे एक प्रेरणादायी फलित आहे
 
 
Vidyarthi Aadhar
 
सरस्वतीचा वरदहस्त आपल्या विद्यार्थ्यांवर असतोच, पण जेव्हा लक्ष्मीचेही पाठबळ लाभते, तेव्हाच त्या ज्ञानाचा पूर्ण उपयोग होतो. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानची ‘विद्यार्थी विकास योजना’ याच तत्त्वावर उभी आहे – की कोणताही हुशार, कष्टाळू विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणींमुळे मागे राहू नये.
माणगाव गावातील तुकाराम तेली याची ही कहाणी हेच अधोरेखित करते. त्याने दहावीच्या परीक्षेत ९५% गुण मिळवले. ही त्याच्या जिद्द आणि मेहनतीची पहिली झलक होती. यानंतर त्याने फार्मसीमध्ये पदवी शिक्षण घेतले आणि त्यातही अव्वल क्रमांक कधीच सोडला नाही. कधी गरज पडली तेव्हा उन्हाळच्या सुट्ट्यांमध्ये काजू फॅक्टरीमध्ये काम करून त्याने आपल्या शिक्षणाचा खर्च भागवला.
त्याच्या मेहनतीचा आणि प्रतिष्ठानच्या पाठबळाचा परिणाम आज दिसतोय — तुकाराम आज सिप्ला सारख्या नामांकित औषध कंपनीत प्रशिक्षणासाठी रुजू झाला आहे.
हे केवळ एका विद्यार्थ्याचे यश नाही, हे एका कुटुंबाच्या स्थैर्याचे प्रतीक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य घडवण्याची ताकद ‘विद्यार्थी विकास योजने’मुळे शक्य होत आहे.
भगीरथ आणि दैनिक - तरुण भारत यांचा हा उपक्रम हेच सांगतो — "मूल्यवान स्वप्नं पाहणाऱ्यांसाठी आम्ही आहोत — पाठबळासाठी, संधीसाठी आणि उज्वल भविष्यासाठी."
Powered By Sangraha 9.0